Friday, November 28, 2014


  साईबाबांनी दिली एकात्मतेची शिकवण...मशिदीत पेटवली धुनी...
शिर्डी ,वार्तापत्र- साईंनी त्यांच्या हयातीत व्दारकामाई मशिदीमध्ये धुनीच्या रूपाने पेटवलेली एकात्मतेची ज्योत आजही सर्व मानव जातीला सर्वधर्म समभावाची शिकवण देत आह़े यामुळेच साईंच्या शिर्डीची राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून जगभर ओळख निर्माण झाली आह़े भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती (31 ऑक्टोबर) राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते या धर्तीवर शिर्डीचे महत्त्व अधोरेखित होत आहे.  जवळपास दीडशे वर्षापूर्वी साईबाबांचे शिर्डीत आगमन झाल़े त्यांनी वास्तव्यासाठी येथील पडकी
 
मशीद निवडली. मशिदीची साफसफाई करून त्यांनी तिला व्दारकामाई मशीद नाव दिल़े मशिदीत बाबा स्वहस्ते अन्न शिजवत व एकाच पंक्तीत सर्व जातीधर्माच्या भक्तांना खाऊ घालीत़ बडेबाबा रोज बाबांच्या बरोबर पंक्तीला असत़ बाबा मशिदीत राहून फकिराचा पेहराव घालत त्यामुळे मुस्लिमांना, तर मशिदीत धुनीच्या रूपाने अखंड अग्नी पेटवलेला असल्याने हिंदूंनाही ते आपले वाटत.  बाबा जसे गीतेमधील श्लोक सांगत तसे कुराणातील आयातचाही आधार घेत़ यामुळे हिंदू-मुस्लीम दोघांच्या दृष्टीनेही द्वारकामाई मशीद पवित्र ठिकाण बनल़े बाबांच्या भक्तांमध्ये हिंदू, मुस्लीम, पारशी, ख्रिश्चन भाविक होते. निर्वाणापूर्वी साईबाबांनी 15 दिवस अगोदर वङो यांच्याकडून द्वारकामाईत रात्रंदिवस रामविजय ग्रंथाचे वाचन करून हिंदूंना निर्वाणाचा संदेश दिला होता़ तसाच औरंगाबादचे मुस्लीम संत बन्ने मिया यांनाही कासिम नावाच्या भाविकाकडे अडीचशे रुपये पाठवून कव्वाली व न्यास करण्यास सांगितले होत़े 


15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयादशमी संपून एकादशी लागताच बाबांचे निर्वाण झाले. तेव्हा नव दिन नव तारीख म्हणजे त्या दिवशी मुस्लीम कॅलेंडरप्रमाणो 9 तारीख, मोहरमच्या नवव्या दिवशी बन्ने मियांना कळवलेल्या दिवशीच बाबांनी देह ठेवला़ त्या दिवशी बुद्ध जयंती होती तसा पूर्व भारतात दुर्गा उत्सवाचा समाप्ती दिन होता, असा दाखला मिळतो़ एकंदरीत शिर्डीच्या साईबाबांच्या सर्व लिलांचा आढावा घेतल्यास एक बाबा प्रमुख्याने निदर्शनास येते ती म्हणजे आज शंभर वर्षापुर्वी त्यांनी एक समानतेची शिकवण दिली, हे वार्तापत्र सादर करतांना मला आजच्या विघटीत झालेल्या समाजाबद्दल काही तरी लिहावे, अशी इच्छा जागृत झाली आणि त्यात साईबाबांच्या जीवनात घडलेलल्या एकात्मता शिकवणीचे धडे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला असे वाटते की समाज हा सुज्ञ आहे त्याला फक्त एक दिशा देण्याची गरज असुन साईबाबां सारख्या संतांच्या विचार त्यांच्यावर बिंबवण्याची गरज आहे.

...........सुनिल दवंगे शिर्डी. अहमदनगर.

No comments:

Post a Comment